१९५१ साली जनगणना झाली त्या वेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती?www.marathihelp.com

भारताची जनगणना १९५१ ;

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती. १९५१ मध्ये भारताची लोकसंख्या १८,५५,२८,४६२ पुरुष आणि १७,५५,५९,६२८ स्त्रिया अशी एकूण ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद) होती. १९५१ मध्ये एकूण लोकसंख्या ही स्वातंत्र्याअगोदरच्या जनगणनेपेक्षा १३.३१% ने अधिक वाढली होती.

जनगणना

१९५१ च्या जनगणनेनुसार,

भारताची एकूण लोकसंख्या - ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद)
पुरुष - १८,५५,२८,४६२ (५१.३८%)
स्त्री - १७,५५,५९,६२८ (४८.६२%)
लिंग गुणोत्तर - ९४६ महिला प्रति १००० पुरुष
१९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण साक्षरता १६.६७% ,तर पुरुष साक्षरता २४.९५% आणि स्त्री साक्षरता ७.९३% एवढी होती.
लोकसंख्येची घनता - ११७ प्रति कि.मी.२
शहरी लोकसंख्या १७.२९%

१९५१ मध्ये जम्मू-काश्मीरची जनगणना झाली ना

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 3884 +22